जाहिरातीसाठी संपर्क

रासानिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात गांडूळ

 रासानिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात गांडूळ

रासानिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात गांडूळ हे दिसतच नाहीत आणि दिसले तरी खूपच तुरळक ठिकाणी दिसतात. विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात सध्या तरी मोठ्या प्रमाणात फक्त लाल गांडूळच दिसत आहेत,
 पांढरे गांडूळ न दिसण्याच कारण जमिनीतील सुगधं कमी झाला आणि दुर्गन्ध मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लाल गांडूळ हे दुर्गंधीत जिवाणू खातात, जमिनीत सुगंधीत जिवाणू (actinomycetes) वाढायला सुरुवात झाली ना की मग आपोआपच पांढरे गांडूळ हे वाढायला सुरुवात होते.
मी आणि आपला ऋषी जंगलात फिरत असताना जमिनीतून सफेद मुसळी काढत होतो तेव्हा त्याच्या मुळाशी आम्हला तीन पांढरे गांडूळ सापडले, कारण जंगलात आजून सुगधं हा जिवंत आहे.
 ज्या दिवशी आपल्या जमिनीत मोठ्या प्रमाणात असे पांढरे शुभ्र गांडूळ दिसायला सुरुवात होईल ना तेव्हा समजून घ्या की आपली जमिन पहेलवान झाली, आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पांढरे गांडूळ वाढायला सुरुवात झाली आहे ही सुद्धा आनंदाचीच गोष्ट आहे.
जंगलात फिरायला मी नेहमीच जातो, तिथे बऱ्याच गोष्टी ह्या मी पहिल्या आणि अनुभवल्या सुद्धा आहेत, जंगलात व शेतीत बरच साम्य आहे, जंगलातले बरेच सिद्धांत हे जस्यास तसे आपल्या विषमुक्त शेतीत लागू होतात पण जंगलात (निसर्गात) व शेतीत एक खूप मोठा फरक आहे तो म्हणजे निसर्गात माणसाचा हस्तक्षेप नसतो आणि शेतीत माणसाचा हस्तक्षेप हा असतो.
 हा एकच फरक खूप काही शिकवून जातो, निसर्गात जर माणसाने हस्तक्षेप केला तर तिथे ऱ्हास होतो आणि शेतीत माणसाने योग्य हस्तक्षेप केला तर समस्त सृष्टी च भरन पोषण होत.
मी फक्त माझ्या अनुभवावरून सांगतो शेती ही नैसर्गिक होऊ च शकत नाही, पण हा निसर्गातले खूप सारे सिद्धांत हे शेतीत जस्यास तसे लागू होतात, काही पिकांमध्ये माणसाचा हस्तक्षेप सुद्धा हा खूप कमी होऊ शकतो, पण निसर्ग आणि शेती हे वेगळे-वेगळे आहेत. 
जर निसर्गानेच संपूर्ण सृष्टी च भरनपोषण होणार होत तर आपल्या प्राचीन काळातील ऋषींनी शेतीची निर्मितीच केली नसती. निसर्गात काही करावं लागतं नाही पण शेतीती माणसाला उत्तम कर्म हे करावच लागत आणि ते केल्याशिवाय भरगोस उत्पादन हे होत नाही.
मला सांगायचे एवढेच आहे की शेतीत योग्य नियोजन, योग्य कर्म आणि कष्ट करायलाच हवेतच ते पण निसर्गातले सिद्धांत वापरून. निसर्गाचा आणि शेतीचा योग्य समन्वय हवा आहे, तरच विषमुक्त शेती ही उत्तम प्रकारे होऊ शकते.
---------------

Post a Comment

0 Comments